केतन खेडेकर
काही महिन्यांपूर्वी पूर्वी उल्हासनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला बद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीन वेळा निवेदन देऊन त्यांच्यावर हल्ला करणारे दोषींवर कुठलीच कारवाई झाली नाही व गुन्हेगारांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकारींवर ही कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याकारणाने नोवेल साळवे यांचा चार दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे धरणा आंदोलन सुरू आहे परंतु आश्चर्याची गोष्ट आहे महाराष्ट्र विधानसभा चे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना देखील आजपर्यंत कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदारांनी किंवा मोठ्या नेत्यांनी साळवे यांच्या आंदोलना विषय प्रश्न उपस्थित केले नाही, राज्य सरकार कडून न्याय मिळेपर्यंत माझा आंदोलन सुरू राहील.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रातील येवढा मोठा पक्ष असुन देखील आम्हाला गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे धरणा आंदोलन करत आहेत तरी राज्य सरकार दखल का घेत नाही असा आरोप नोवेल साळवे करत आहेत.








